India Women Squad For T20i Series Against South Africa : टीम इंडिया एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली.
अवघ्या काही दिवसांनी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची सुरुवात होणार आहे. या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामाची सर्व लगबग सुरु आहे. या दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने मंगळवारी 24 मार्च रोजी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमवरुन याबाबतची माहिती दिली आहे. निवड समितीने या मालिकेसाठी कुणाचा समावेश केलाय हे जाणून घेऊयात.
1 मालिका, 5 सामने आणि 15 खेळाडू
वुमन्स टीम इंडिया आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार सुरु असताना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि वुमन्स टीम इंडिया यांच्यात 17 ते 27 एप्रिल दरम्यान या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. प्रतिका रावल हीला या टी 20i मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. तर अमरावतीकर भारती फुलमाळी हीचा समावेश करण्यात आला आहे.
5 पैकी 4 सामने एकाच मैदानात
उभयसंघातील 5 पैकी 4 टी 20i सामने हे एकाच मैदानात होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.उभयसंघातील टी 20i मालिकेतील पहिले 2 सामने हे डरबनमध्ये होणार आहेत. त्यानंतर तिसरा आणि चौथा सामना हा जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर पाचवा आणि अंतिम सामना 27 एप्रिलला बेनोनीमधील विलोमूर पार्क क्रिकेट स्टेडियम खेळवण्यात येणार आहे.
दोघींची पहिल्यांदाच निवड
दरम्यान निवड समितीने टी 20i संघात पहिल्यांदाच 2 भारतीय खेळाडूंना संधी दिली आहे. काश्वी गौतम आणि अनुष्का शर्मा या दोघींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या दोघींना टी 20i पदार्पणाची प्रतिक्षा असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी, श्रेयांका पाटील, काश्वी गौतम, भारती फुलमाळी, उमा चेत्री (विकेटकीपर) आणि अनुष्का शर्मा.










