Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

Operation Sagar Bandhu : संकटात भारत श्रीलंकेच्या पाठिशी उभा राहिला, वाचवले हजारो लोकांचे प्राण, अशी सुरु आहे मदत

चक्रीवादळामुळे अडकलेल्या अंदाजे १५०० हून अधिक भारतीय नागरिकांना भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानांनी आणि व्यावसायिक विमानांनी सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले.

Advertisement Box

दित्वा चक्रीवादळामुळे श्रीलंकेला मोठा फटका बसला आहे. यामुळे श्रीलंकेचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताने तातडीने श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला आहे. ऑपरेशन सागर बंधु (Operation Sagar Bandhu) अंतर्गत २८ नोव्हेंबरपासून हवाई आणि सागरी मार्गाने आतापर्यंत ५३ टन मदतीचे साहित्य श्रीलंकेला पोहोचवण्यात आली आहे. तसेच या संकटात अडकलेल्या १५०० हून अधिक भारतीय नागरिकांनाही सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले आहे.

मदतीच्या किटमध्ये काय?

भारताने आधी शेजारी या धोरणातंर्गत आणि व्हिजन महासागरच्या मार्गदर्शनाखाली २८ नोव्हेंबर रोजी हे व्यापक शोध, बचाव आणि मदत अभियान सुरू केले. यात भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस विक्रांत, आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस सुकन्या यांच्याद्वारे मदत पोहोचवण्यात आली. तसेच भारतीय वायुसेनेच्या ट्रान्सपोर्ट विमानेही मदत घेऊन कोलंबो आणि त्रिनकोमाली येथे पोहोचली. या मदतीमध्ये ९.५ टन आपत्कालीन रेशन, तंबू, ब्लँकेट, स्वच्छता किट, तयार खाद्यपदार्थ , औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे.

तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ८० जणांची विशेष टीम तसेच ५ व्यक्तींचे वैद्यकीय पथक देखील श्रीलंकेत तैनात करण्यात आले आहे. त्यासोबतच आयएनएस विक्रांतचे चेतक हेलिकॉप्टर्स आणि भारतीय वायुसेनेचे एमआय-१७ हेलिकॉप्टर्स श्रीलंकेच्या वायुसेनेसोबत मिळून मोठ्या प्रमाणावर बचाव अभियान राबवत आहेत. यात अनेक गर्भवती महिला, बालके आणि गंभीर जखमींसह अडकलेल्या लोकांना हवाई मार्गाने बाहेर काढले जात आहे.

चक्रीवादळामुळे अडकलेले १५०० हून नागरिक मायदेशी परतले

या बचावलेल्या लोकांमध्ये श्रीलंका आणि भारताव्यतिरिक्त जर्मनी, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, पोलंड, पाकिस्तान आणि बांगलादेशसह अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. एनडीआरएफची पथके पूरग्रस्त भागांमध्ये शोध आणि बचाव कार्य करत आहे. त्यासोबतच स्थानिक कुटुंबांना मदतही दिली जात आहे. भारत आणि श्रीलंकेने केलेल्या या संयुक्त अभियानात आतापर्यंत १२१ हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. तसेच चक्रीवादळामुळे अडकलेल्या अंदाजे १५०० हून अधिक भारतीय नागरिकांना भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानांनी आणि व्यावसायिक विमानांनी सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले.

भारत या कठीण काळात श्रीलंकेचे सरकार आणि जनतेसोबत एकजुटीने उभे राहत असल्याने सर्व स्तरावरुन भारताचे कौतुक केले जात आहे. तसेच भारताकडून मिळालेल्या मदतीला पूर्ण पाठिंबा देऊ, असे श्रीलंकेने सांगितले आहे.

 

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

Advertisement Box

शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026

आजचा सुविचार

भूतकाळावर लक्ष देऊ नका, भविष्याबद्दल स्वप्ने पाहू नका, आपले मन वर्तमान क्षणावर केंद्रित करा. आज आपण जे करता तेच आपल्या उद्याची निर्मिती करते आणि हाच जीवन जगण्याचा योग्य मार्ग आहे. वर्तमानात जगणे हेच खरे जीवनज्ञान आहे.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp